हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

मोदी आणि चंद्रचूड हे कधीही भेटले तरी मिठ्ठी मारली तरीही कसलाही आक्षेप नाही. हे दोनही लोकं संविधानिक पदावर आहेत. मोदी पंतप्रधान आहे. चंद्रचूड सरन्यायाधीश. त्या संविधानिक पदावर बसल्यावर काही संकेत पाळायचे असतात. तेच काल मोडून टाकले गेले. ज्यांना थोडंफार कळतं त्यांची अवस्था झाली कि 'हागणाऱ्याने लाजावे कि बघणाऱ्याने लाजावे?' सरन्यायाधीशाचं काम असतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संवर्धन करणे आणि सरकार नीटपणे चाललंय की नागरिकांना त्रास देतंय हे पाहणं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन लोक एक रोजी उठतात आणि पक्षातील अनेक आमदार खासदारांना घेऊन पक्ष पळवतात. यात पन्नास खोके दिल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर याने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे आणि अजित पवारांना देऊन टाकणे हे नेमकं कुठल्या नितीमत्तेत बसतं? कुठल्याही सर्वसामान्य माणूस सांगू शकेल की दबावामुळे हे निर्णय आलेत. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा एकनाथ शिंदे हा खरोखरच माझा मुख्यमंत्री आहे का? कि तो घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे? हे जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे. जर समजा शिंदे घटना...