पोस्ट्स

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

इमेज
मोदी आणि चंद्रचूड हे कधीही भेटले तरी मिठ्ठी मारली तरीही कसलाही आक्षेप नाही.  हे दोनही लोकं संविधानिक पदावर आहेत. मोदी पंतप्रधान आहे. चंद्रचूड सरन्यायाधीश. त्या संविधानिक पदावर बसल्यावर काही संकेत पाळायचे असतात. तेच काल मोडून टाकले गेले. ज्यांना थोडंफार कळतं त्यांची अवस्था झाली कि 'हागणाऱ्याने लाजावे कि बघणाऱ्याने लाजावे?' सरन्यायाधीशाचं काम असतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संवर्धन करणे आणि सरकार नीटपणे चाललंय की नागरिकांना त्रास देतंय हे पाहणं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन लोक एक रोजी उठतात आणि पक्षातील अनेक आमदार खासदारांना घेऊन पक्ष पळवतात.  यात पन्नास खोके दिल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर याने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे आणि अजित पवारांना देऊन टाकणे हे नेमकं कुठल्या नितीमत्तेत बसतं?  कुठल्याही सर्वसामान्य माणूस सांगू शकेल की दबावामुळे हे निर्णय आलेत.  आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा एकनाथ शिंदे हा खरोखरच माझा मुख्यमंत्री आहे का? कि तो घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे? हे जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे.  जर समजा शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्र

भारत आणि ऑलिम्पिक पदकं

इमेज
आपल्याला आजवर 4 मेडल मिळाले त्यात एकही गोल्ड नाही आणि सिल्व्हर नाही. बाकी देशाकडे पाच पटीने गोल्ड मेडल आहेत. हि गोष्ट खरी असली.  तरी येणारा काळ आपला असेल.  आपला अविनाश साबळे हा सहभागी झाल्यावर किंवा मेडल मिळाल्यावर स्टीपलचेस नावाचा खेळ असतो हे कळालं. बीड जिल्ह्यातील खेडेगावातील मुलगा त्यात पदक मिळवतो ज्या खेळाचे नाव 90% भारतीयांना माहीतही नसेल.  पण डेडिकेशनने खेळणारे मनू भाकर, स्वप्नील कुसाळे यांनी पदक मिळवले. आपला अविनाश साबळे पात्रता फेरीत टिकला. नंतरून पदक नाही मिळाले. सुरवातीला खेळ चांगला होतो आणि नंतरून आपले बहुतांश खेळाडू ढेपाळतात ही सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी युरोपियन देशात विशेष ट्रेनिंग असतं. ते ज्या पद्धतीने खेळाडूंवर विश्वास दाखवतात तेवढी चांगली व्यवस्था आज तरी नाही आपल्याकडे.  आपला देश स्वतंत्र होऊन 75 उलटून गेले तरीही फारसं आपण सर्वच क्षेत्रात नवीन काही करत नाही. किंवा तशा नवनिर्माण करण्याला पोषक वातावरण नाही. पोटार्थी शिक्षण आहे. इथल्या बड्या कंपन्यांना नोकरदार, कामगार, मजूर पुरवण्याचे काम आपली शिक्षणव्यवस्था करते.  माझे अनेक मित्र खेळाडू होते. पट्टीचे खोखो खेळणारे होते

राजकीय कार्यकर्त्यांची हुशारी

राजकीय कार्यकर्ते ही हूशार जमात आहे.  मध्यंतरी कुठलाही राजकीय नेता आला की JCB वरून झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या उधळत असत.  आता ते चित्र फारसे दिसत नाही.  कारण झेंडू झालाय महाग. आता ते परवडत नाही.  मध्यंतरी फुलं उधळायचे तेव्हा दर होता ५-१० रूपये किलो. उकीरड्यावर नेऊन फुलं उधळण्यापेक्षा आपल्या दलिंदर नेत्यांवर उधळावेत असे कार्यकर्त्यांना वाटत असावे.  कार्यकर्ते नेत्याचा रिस्पेक्ट करतात वगैरे समज असला तर तो गैर आहे हे लक्षात घ्यावे. कार्यकर्ते अफाट हूशार असतात.

YouTube -thumbnail

इमेज
YouTube वर अक्षरशः काहीही विषयावर व्हिडिओ असतात. एक व्हिडिओ सहजच दिसला. 'पहिलं प्रेम कसे विसरावे? '  फक्त thumbnail वाचला. पाहिला. मी हजारदा माझ्या मनाला सांगितले आहे काहीही करायचं पण उगचच्या उगच दुखवून नाही घ्यायचं. प्रेम वगैरे भानगडी विसरलेल्या असताना झक मारत एक्स गर्लफ्रेंड ची भयानक याद आली. वाईट वाटले राव. आणि स्क्रोलिंगच्या नादात आता विसरावं म्हणून तो व्हिडिओ हुडकावं म्हणटलं तर ते पण गावेना. ह्या प्रेमाच्या तर आयचा घोडा.‌  पण ते व्हिडिओ तयार करणाऱ्यांना मानलं पाहिजे.

शाकाहार -मांसाहार आणि पर्युषण पर्व

शाकाहार मांसाहार हा वाद सालाबादप्रमाणे यावर्षीही पर्युषण पर्वाच्या तोंडावर चालूच राहीलाय.  हा हलकटपणा आहे. तुमचा धर्म तुम्हाला शाकाहारी राहायला सांगतो तर तुम्ही शाकाहारी स्वतः रहा. त्याचं जे पाप किंवा पुण्य असेल त्याचा हिशोब तुमच्यासाठी होईल.  कोणत्याही दूसऱ्या माणसाला शाकाहारी व्हा म्हणून सांगायची नेमकी गरज काय आहे? दूसरा जे काही खाईल ते खाऊ दे. दूसऱ्या व्यक्तीला त्याचं वेगळं मत असू शकतं हे मान्य करावं. हे जैन धर्मातील अनेकांत वाद सांगतो.  दूसऱ्याला त्याचं मत आहे. त्या मताचा सन्मान करावा हे जैन धर्म सांगून बसलाय. असेही सर्वांचेच पुर्वज मांसभक्षण करत होते. त्यांचेच आपण सगळे विश्वातले लोक वंशज आहोत.  त्यामुळे दूसऱ्याला मांसाहार करण्यापासून रोखणं. मांस विक्री बंद करा म्हणने हेच मूळात जैन धर्माच्या विरोधात जाण्यासारखे आहे.  दूसरा व्यक्ती मांसाहार केल्यानं आपलं काय बिघडणार आहे? त्याचं जे पाप पुण्य असेल ते त्याला लागेल.  उद्या आपण मांजर,कुत्रा,वाघ, सिंह यांना पण शाकाहारी करायचा शहाणपणा करणार काय?  नसत्या उठाठेवी करून ह्या लोकांना वाटतं की आपण जैन धर्म कट्टरतेने पाळतोय. पण या ठराविक लोकांचे

समरजित घाटगे यांनी पक्षप्रवेश करावाच!

इमेज
राजे समरजित घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत अशा चर्चा आहेत.  खरंतर राजेंनी हा पक्ष प्रवेश करावाच. हसन मुश्रीफ यांचा पराभव मागच्यावेळी होता होता राहिला. कागल मध्ये जसा मुश्रीफांना माननारा वर्ग आहे. तसाच शरद पवार साहेबांना माननाराही मोठा वर्ग आहे.  राजे आता भाजपात असले तरी त्यांच्याकडे मुश्रीफांचा कट्टर विरोधक म्हणूनच त्यांच्या मागे जनता आहे. भाजप मधून जर पक्षांतर केलं तरीही हि मागची मतं कुठंही जाणार नाहीत. ती राजेंसोबतच असतील.  आज कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करायलाही कुणी खमका किंवा मोठा माणूस नाही. जर राजेंनी इकडे प्रवेश केला तर ते संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करतील.  आज ते भाजपमध्ये आहेत मात्र जिल्ह्याचे नेतृत्व हे महाडिक साहेबांकडे आहे. ईकडे संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार राजेच असतील. मुश्रीफांना संजय घाटगेंनी जरी पाठिंबा दिला असला तरीही त्यांच्यामागे असणारे कार्यकर्ते मुश्रीफांना मतं टाकतील याचा काही नेम नाही.  ग

दादा हिच ती वेळ!

इमेज
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले. येऊन काय केलं? तर पवारसाहेबांवर टीका केली. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा ' असा उल्लेख केला होता. त्याही आधी 'पवार शरद यांचा पराभव ' मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना करायचा आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. लोकसभेत काय झाला परिणाम? तर भाजपचा कार्यक्रम झाला. पवारसाहेबांवर बोललेलं खुद्द अजितदादांनाही आवडलं नव्हतं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं आहे. मूळात दादा-भाजप हि युतीच विळ्याभोपळ्याची असल्याचे खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही म्हणने आहे. दादांना त्यावेळी वाटलं होतं. पवारसाहेबांवर बोलल्याने जर नुकसान झालं होतं. तर आजही अमित शहा पवारसाहेबांवर बोलले आहेत. जिथे अनेक आमदार दादांचे आहेत. याचा फटका विधानसभेत बसणार नाही का?  अजितदादांकडे पॉवर आहे. त्यांनी भाजपचा नाद सोडावा आणि महाविकास आघाडीचाही नाद करू नये. काय होईल ते होईल म्हणून सेप्रेट लढणं योग्य होईल.  दादा जर सेप्रेट लढले तर दादांच्या संख्याबळाशिवाय महाराष्ट्रात कोणतेही सरकार येणार नाही. दादांकडे अनेक चेहरे असे आहेत ज्यांना इच्छा असूनही तिकीट देता येत ना