भक्तांना भारत समजला नाही.

पहलगाम हल्ला हा भारतावर झाला होता. तिथे अतिरेक्यांनी धर्म विचारला. धर्म विचारून हत्या केली. यात मध्ये पडणाऱ्या काश्मिरी मूसलमान व्यक्तीलाही मारलं. भाजपच्या अधिकृत ट्विट हँडलवरून घिबली फोटो करून धर्म पुछा जाती नाही करून जाहिरात करण्यात आली. तिथे ज्यांच्या कुटूंबीयातील लोक मृत्युमुखी पडले होते. त्या कुटुंबातील लोकं सांगत होते काश्मिरी मूसलमान लोकांनी आमची मदत केली. पण भक्तांना आपला अजेंडा राबवायचा होता. त्यांनी मूसलमान समाजाविरुद्ध गरळ ओकायला सुरवात केली. मूसलमानावर आर्थिक बहिष्कार टाका अशा स्वरुपाची जाहीरात केली. अनेक मिसरूड न फुटलेली पोरं ही इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे रील्स पसरवत होते. ह्या दहशतवादी कृत्याला तडाखेबाज उत्तर आमच्या शूर जवानांनी दिलं. सिंदूर ऑपरेशन करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी! सोफिया कुरेशी मूस्लिम. इकडे राजकीय बाजूला असदुद्दीन ओवेसी हे कमान सांभाळत होते. त्यांनी पाकिस्तानला लायकी दाखवून दिली. ओवेसींना अख्ख्या देशाने डोक्यावर घेतल्यानंतर द्वेषभ...