कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!
कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव इथल्या ४० आणि ४२ वर्षीय दोन मित्रांनी एकाच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही मित्रांचे व्यवसाय होते एकाचा ट्रक तर दूसऱ्याचा जनावरांचा गोठा. दोघांनाही कर्ज होतं आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी दोनही मित्रांनी जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाला फक्त १० दिवसांपुर्वी मुलगी झाली होती. हृदय पिळवटून टाकणारी हि घटना घडली. त्यांनी ज्या झाडाला गळफास लावला ते झाड आत्महत्या करणेसाठी कुप्रसिद्ध झाले आहे. सहज हि बातमी वाचनात आली. वाईट वाटलं. मात्र ह्या वाईट वाटण्याचे हि अलिकडे काही कौतुक राहिले नाही. एवढी माणसे किड्यामुंग्यासारखी मरत आहेत. हि मरणारी माणसं कोण आहेत? शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक हे भारतातील सामान्य लोक. आणि याच इंडियातील निरव मोदी, मेहूल चौकसी, विजय माल्या, ललित मोदी आणि असेच डझनभर लोक भारतात कर्जं करून परदेशात ऐशोआरामात जगत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणीचे कर्ज असेच माफ होत आहे. अंबानी, अदाणी आणि त्यासारख्या शेकडो उद्योजकांचे कर्ज असेच सरकार माफ करते आणि त्याच भारताचा नागरिक असणाऱ्या कोल्हा...