पोस्ट्स

कोल्हापूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव इथल्या ४० आणि ४२ वर्षीय दोन मित्रांनी एकाच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.  या दोन्ही मित्रांचे व्यवसाय होते एकाचा ट्रक तर दूसऱ्याचा जनावरांचा गोठा. दोघांनाही कर्ज होतं आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी दोनही मित्रांनी जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाला फक्त १० दिवसांपुर्वी मुलगी झाली होती. हृदय पिळवटून टाकणारी हि घटना घडली. त्यांनी ज्या झाडाला गळफास लावला ते झाड आत्महत्या करणेसाठी कुप्रसिद्ध झाले आहे.  सहज हि बातमी वाचनात आली. वाईट वाटलं. मात्र ह्या वाईट वाटण्याचे हि अलिकडे काही कौतुक राहिले नाही. एवढी माणसे किड्यामुंग्यासारखी मरत आहेत.  हि मरणारी माणसं कोण आहेत? शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक हे भारतातील सामान्य लोक.  आणि याच इंडियातील निरव मोदी, मेहूल चौकसी, विजय माल्या, ललित मोदी आणि असेच डझनभर लोक भारतात कर्जं करून परदेशात ऐशोआरामात जगत आहेत.  भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणीचे कर्ज असेच माफ होत आहे. अंबानी, अदाणी आणि त्यासारख्या शेकडो उद्योजकांचे कर्ज असेच सरकार माफ करते आणि त्याच भारताचा नागरिक असणाऱ्या कोल्हा...

बंटी पाटील -कट्टर राजकारण

इमेज
आजच्या कोल्हापूर उत्तरच्या विजयाने, बंटी पाटील जोरदार चर्चेत आलेत.  बंटी पाटील 'आमचं ठरलंय!' असं म्हणतं कोल्हापूरातील सर्व महत्वाची सत्तास्थाने त्यांनी हस्तगत केली.  बंटी पाटील भारी आहेत, पण त्याहून त्यांचं राजकारण कशासाठी भारी आहे ? एकदा विरोध म्हणटला कि विरोध, जागेवर ठरलं तिथं तडजोड नाही. आता खरतर राज्यभरात लोक इतके हलकट झालेत कि सत्तेसाठी पक्षच काय बापही बदलतील. मात्र बंटी पाटलांनी कधी काँग्रेस सोडली नाही, कि विरोधकाचा रोल ढिल्ला पडू दिला नाही.  एकदा विरोध तर कट्टर विरोध तिथं मग माया ममता, नातीगोती कसली काही भानगडी नाहीत. या कट्टरपणामागेच जनता असते आणि हेच खरं राजकारण आहे. माझी सीट पडली तरी चालेल, माझी सत्ता गेली तरी चालेल पण राजकीय युत्या, आघाड्यांचं भ्रष्ट राजकारण या माणसाने केलं नाही.  आघाडीचा आदेश असतानाही २०१९ लोकसभा निवडणूकीत 'आमचं ठरलंय!' हे ठासून त्यांनी सांगितलं आणि आदेश कोलवून लावला आणि ठरवलं तसंच केलंही.  हे करायला माणूस वाघ लागतो, तसा हा वाघ आहे. नाहीतर एकमेकांबरोबर एडजेस्टमेंट करून सत्ता आणणारी येतातही आणि जातातही पण दखल बंटी पाटील सारख्याच लोकां...