अवगुणांचे हाती । आहे अवघीच फजिती ।।१।।
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ।।२।।
विष तांब्या वाटी । भरली लाउ नये होठी ।।३।।
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ।।४।।
poem
लिंक मिळवा
Facebook
Twitter
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
एकदा ये अशी फूल्ल व्होल्टेजनं, आणि ऊडव माझ्या डीपीच्या फिजा !!! निघू दे धूर, हू दे अंधार !!! smile emoticon
भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ट्रकचा कधी ना कधीतरी संबंध आलेला असतोच. कोणतीतरी एखादी तरी वस्तू ट्रकमधूनच येते. ट्रकडायवर हा पेशा रिस्की असतो. घरातून पंधरा दिवस महिनाभर तो बाहेर असतो. आणि पगार म्हणाल तर त्याच्या मानाने अत्यल्प असतो. घरापासून अनेक दिवस बाहेर असतो. बाकीच्या तुमच्या हाफीसातील ड्युटीवर तुम्ही डुलकी मारू शकता, टंगळमंगळ करू शकता पण ड्रायवर हा पेशा असा आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या भागाला सुद्धा अलर्ट राहावं लागतं. अपघात हे अपघात असतात. जाणूनबुजून कुणालाही कुणी मारायचं धाडस करत नाही. नजरचुकीने अपघात घडतात त्याला पुर्वी दोन वर्षे शिक्षा होती. आता अमितभाईंनी ती शिक्षा १० वर्षांवर नेली. मूळात अशी काही जरूरत नव्हती. ट्रकडायवर होणे हीच तशी एक मोठी शिक्षा आहे. त्यावर अमितभाईंनी आणलेला कायदा म्हणजे नरकात जन्माला एखादा जाणार असेल तर तो भारतात ट्रकडायवर होईल अशी परिस्थिती करून ठेवली आहे. ट्रकचा अपघात झाला की, पुढे असणारा वाहनधारक शक्यतो वाचत नाही तो मरतोच. मात्र अशावेळी मॉब असा काही खवळतो की ट्रकडायवरचा जीव घेऊनच तो शांत होतो. त्यामुळे डायवरला तिथून पळून जाण्याशिवाय काही पर्य
राहूल गांधीची काल फ्रान्स मध्ये एका विद्यापीठात मुलाखत झाली. त्यात तो थेट चायनावर निशाणा साधतो आहे. त्यांच्याकडे असणारी हुकूमशाही आणि म्हणून असणारी कामगारांची पिळवणूक हे मुद्दे त्याने मांडले. चायना को लाल आँखे दिखाना चाहीए वाले मोदीजी चीन भारतावर अतिक्रमण करत असताना चुपचाप बसले आहेत हे अख्खा देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तिथं राहूलने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मुद्दे मांडले आहेत. जगभरातील पत्रकार जी २० परिषदेसाठी आले आहेत. देशात घेत नाहीत ते ठीक पण इतर देशांच्या पत्रकारांशी मोदींना बोलता आलं असतं पण तिथंही त्यांनी ५६ इंची छाती दाखवली नाही ती पत्रकार परिषद टाळली. हे झालं मोदी राहूलचं. आता देशातलं वातावरण पाहीलं तर जवान चित्रपट जोरदार हिट होत आहे. त्यात शाहरूख खानने कुणाविरूद्ध काय आवाज उठवला आहे हे चांगलंच सर्वांना माहीत आहे. शाहरुख खानची जवान वरून वाहवा होत आहे. देशभरात सिनेमा हाऊस फुल्ल आहे. पण त्यातील संदेश ही तरूण वर्ग गांभीर्याने घेत आहे हे महत्त्वाचं. शाहरुख खान ने मतदानाविषयी केलेलं भाष्य लोकांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहणारं आहे. देशभरात भाजपाविरोधी लाट मोठ्या प्रमाणात दिसून य
पाऊस पडालाय. पावसाचं आवाज कसा येतंय. च्किठच्कप्च असं मेणकागदावर पडल्यावर येतंय. मातीत पडलं की सूरवातीला आवाज येत नही, नंतर येतो. माती ही पोरांच्या डोक्यासारखी असते, पोरांचे डोके जास्त भिजते पोरींचं डोकं कमी. कमी डोकं म्हणजे कमी भिजतंय. कारण पोरींचे डोस्के नाही, केस लांबडे असतात, ऊतार असल्याने पाणी घसरून जातंय. पावूस डोक्यात जात नाही. आता वेणीतल्या एखाद्या केसाचे मूळ शोधणे हे कठीण काम. नवीन- ऋषीचे कूळ आणि वेणीतल्या केसाचे मूळ शोधू नये. ऊसाच्या पाल्यासारखे मोकळे केस सोडणार्या पोरी भारी दिसतात. व्हरायटी फक्त 86032सारखी पाहीजे. पोरींचा विचार करायला नको. पावसाचा आवाज. पावसाच्या ठेंबाचा आवाज. पिच्चरात दाखवतात तसं नसतं. पावसाची आई म्हणजे समूद्र, पावसाचा बाप म्हणजे सूर्य. पावसाची बहीण नदी, पावसाचा भाऊ वढा. असं यांच कुटूंब. ढग म्हणजे गर्भाशय. पाऊस नोकरीला शेतात जातो, बादगड संगतीने गटारीत जातो, संस्कार चांगले असतील तर गाय पावसाचे पाणी पिते. हे म्हणजे पुण्याई, गोमूत्र म्हणजे सुवर्णस्वर्ग. पावसाची आई बा काढायला नको. पावसाचा आवाज. पाऊस पाण्यात पडला की टुब्बुक अस आवाज येतंय. मग भाकर्या ऊठत जातात.
टिप्पण्या