अवगुणांचे हाती । आहे अवघीच फजिती ।।१।।
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ।।२।।
विष तांब्या वाटी । भरली लाउ नये होठी ।।३।।
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ।।४।।
poem
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
एकदा ये अशी फूल्ल व्होल्टेजनं, आणि ऊडव माझ्या डीपीच्या फिजा !!! निघू दे धूर, हू दे अंधार !!! smile emoticon
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत आहे. (१) धैर्यशील माने - (शिंदे शिवसेना) (२) राजू शेट्टी- (स्वाभिमानी) (३) सत्यजित आबा सरूडकर (शिवसेना उद्धव ठाकरे) (४) डी.सी.पाटील (वंचित) हे प्रमुख उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे गेले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जुना ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. इथल्या मागील चार निवडणूकांचा अभ्यास केल्यावर काही निरीक्षणं समोर येतात. २००९-२०१४-२०१९ या तीन निवडणूकांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,कारखानदार, साखरसम्राट, सहकारसम्राट ई.) यांच्या विरोधी मतं पडलेली आहेत. २००९ राजू शेट्टी २०१४ राजू शेट्टी यावेळी राजू शेट्टी हे शरद पवार गट यांचेविरोधात लढत होते. २००९ मध्ये ९५,००० इतकं लीड निवेदिता माने यांचे विरूद्ध शेट्टींना मिळालं होतं. (* यावेळी काही काँग्रेसजनांचा छुपा पाठिंबा होता.) तर २०१४ मध्ये राजू शेट्टी हे परत शरद पवार गट विरोधात भाजप -शिवसेनेच्या पाठिंब्यावर लढले. त्यावेळी त्यांचे मताधिक्य कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे विरूद्ध १,७७,००० इतकं अफाट होतं. २०१९ च्या निवडणूकी पुर्वीच शेट्टींनी मोदींची, महायुती च...
पाऊस पडालाय. पावसाचं आवाज कसा येतंय. च्किठच्कप्च असं मेणकागदावर पडल्यावर येतंय. मातीत पडलं की सूरवातीला आवाज येत नही, नंतर येतो. माती ही पोरांच्या डोक्यासारखी असते, पोरांचे डोके जास्त भिजते पोरींचं डोकं कमी. कमी डोकं म्हणजे कमी भिजतंय. कारण पोरींचे डोस्के नाही, केस लांबडे असतात, ऊतार असल्याने पाणी घसरून जातंय. पावूस डोक्यात जात नाही. आता वेणीतल्या एखाद्या केसाचे मूळ शोधणे हे कठीण काम. नवीन- ऋषीचे कूळ आणि वेणीतल्या केसाचे मूळ शोधू नये. ऊसाच्या पाल्यासारखे मोकळे केस सोडणार्या पोरी भारी दिसतात. व्हरायटी फक्त 86032सारखी पाहीजे. पोरींचा विचार करायला नको. पावसाचा आवाज. पावसाच्या ठेंबाचा आवाज. पिच्चरात दाखवतात तसं नसतं. पावसाची आई म्हणजे समूद्र, पावसाचा बाप म्हणजे सूर्य. पावसाची बहीण नदी, पावसाचा भाऊ वढा. असं यांच कुटूंब. ढग म्हणजे गर्भाशय. पाऊस नोकरीला शेतात जातो, बादगड संगतीने गटारीत जातो, संस्कार चांगले असतील तर गाय पावसाचे पाणी पिते. हे म्हणजे पुण्याई, गोमूत्र म्हणजे सुवर्णस्वर्ग. पावसाची आई बा काढायला नको. पावसाचा आवाज. पाऊस पाण्यात पडला की टुब्बुक अस आवाज येतंय. मग भाकर्या ऊ...
अनेकांना वाटत असते की, राहूल गांधींनी निवडणूका जिंकाव्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे. पण असेही लोकं जे काँग्रेसशी संबंधित नाहीत पण राहूल गांधींचं भलं व्हावं वाटतं त्यांचीही इच्छा असते. दरवेळी निवडणूक येते. वातावरण तयार होतं आणि निकालादिवशी वेगळं चित्र निर्माण होतं. निकालादिवशी गोदी मिडीयातले पत्रकार लोकं विश्लेषण करताना अमुक तमुक जातीची मतं कशी भाजपनं बांधली, मोदींनी अमुकतमुक देवाचा, संप्रदायाचा कसा उल्लेख केला आणि त्याचा कसा निवडणुकीत फायदा झाला. तसेच अमित शहांची चाणक्य निती, अमित शहांनी कशी बंडखोरांची समज काढली. अमित शहांनी कसे एखाद्या अपराध्याला पाठीशी घातले, अमित शहांनी डेरा टाकून कशा बैठका घेऊन नियोजन केलं. हे सगळं ऐकून इतक्या सवयीचं झालं आहे की, निवडणूक फक्त मोदी शहांनी लढवावी आणि राहूलनी फक्त पराभव होत रहावं आणि दोन कवडीची किमंत नाही अशा गोदी मिडीयातील लोकांकडून आत्मचिंतन करण्याचे सल्ले ऐकून घ्यावेत हे सवयीचे झाले आहे. आता तुम्हाला मला कुणालाही कळतं ते राहूल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना नसेल का कळत? अमुकतमुक भोंदू बाबाच्या संप्रदायाची इतकी मतं...
टिप्पण्या