म्हणून बिरबल हूशार वगैरे असतो.

तर बिरबल चतूर असतो. अकबरच्या बायकूला हे काय हे पटतंच नही. ती म्हणत्या माझा भौ बिरबलकिंदा हूशार हाय. अकबर म्हणतोय घंटा !
बायकू म्हणत्या तुमची सगळी लफडी बिरबलाला ठौक असतील म्हणून तुमी माझ्या भावाला नाकारतासा.
हिला कसं समजवायचं म्हणून अकबर विचार करतंय. संध्याकळी म्हणतंय ' हे बघ बई ऊगंच लोकशयी हाय म्हणून तूझं ऐकलंच नही असं व्हायला नको, आपन उद्या काॅनटेस्ट घिवू आणि ठरवू कोण किती ख्वाल हाय ते.' 
बायकू खूष हूत्या, जावून भावाला सांगत्या उद्या कानटेस्ट हाय म्हणून.
रात्रभर बुद्धिमत्तेची गणित ते सोडवून घेत्या भावाकडंन. ते बो गाफटं सगळं सोडवतंय. नावनाव भावाचं आयक्यू डेव्हलप झालेलं बघत्या. खूष हूत्यात राणीसायेब.
सकाळी लवकर ऊठवून भावाकडंन प्राणायाम ते करून घेत्या.
तिकडं बिरबल हिकडं तिकडं बोंबलत हिंडून राज्यकारभार ते बघून येतंय.
पर्देच्या ठिकाणी दोघं येत्यात. अकबरची येंट्री हूते. मूजरा, रामराम शामशाम हूतंय.
मग दोघाकडं बघून अकबर खेळाचं नियम समजवून देत्यात.
मग दोघांच्या हातात चारआणे देतंय. म्हणजे शेप्रेट शेप्रेट. आणि दोघास्नी सांगतंय. चाराण्याची सूतळी घिवून यायची आणि इकडं येताना ट्रंक भरील येवढं पैशे आणायचं. बिरबल ऐकतंय आणि जातंय ट्रंक घिवून. ह्ये मेव्हण पण लगेच बाहेर पडतंय मनातल्या मनात शिव्या घालत. (आय घाटलो आणि बुद्धिमतेचा अभ्यास केलो असं त्याला वाटतंय)
मग एका दूकानात जातंय आणि सूतळी मागतंय हे. दूकानदार देतोय आणि पैसे मागतो. ह्यच्याकडं मोजून चारआणे असत्यात. आता कसं करायचं ? म्हणून विचार करतंय ते. डोस्क्याला आऊट आल्यागत हूतंय आणि पळत सूटतंय हे. मग त्यो दूकानदार बी पक्के शेठजी असतोय. हरवलेला आठआणे शोधण्यासाठी पन्नास रूपयाचा गडी लावनारा. दूकानातली दोनचार कंड पोरं त्याच्या माग लावतो. ते पळत सूटदेलं असतंय. मागनं पाठलाग करतेलं बघून हे भित्रं राजवाड्यात पळून जातंय.
तिकडं बिरबल दुकानात सूतळी मागतंय. दकानदार फ्रि मध्ये देतोय ह्याला. रस्त्यावरंन सूतळी टाकतंय दुकानपर्यंत आणि दूकानदाराला म्हणतंय दूकान धा फूट अतिक्रमणात हाय. दूकानदार घाबरतंय. म्हणतंय पाश्शे देतो मिटवा. ह्ये म्हणतंय. हजार !
दूकानदार गप्पगुमानं हजार रूपये देतो आणि रिकामं होतंय. ह्यो गडो गावभरं सूतळीनं माप काढत जनतेला लूटून ट्रंकभर पैसे भरून नेतंय. राजाला म्हणतंय घे. नेहमीप्रमाणे अकबर खूष हून बक्षिस वगैरे देतो. बायकूचं भवू कारकून म्हणून ठिवून घेता यील असं राजाला वाटलं असलं तरी ते पण चान्स देत नही राजा त्याला. म्हणून बिरबल हूशार वगैरे असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!