पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाव तसं चांगलं

गाव म्हणजे ठराविक जणांचाच रुबाब, त्यांचाच हुकूम, ठराविक लोकच शहाणी असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पुर्वी हे असायचं पण. आत्ता परिस्थितीती बदलून नवीन गाव तयार झाला.   गाव हे ठराविक लोकसंख्येचंच असल्याने कुणाच्या गोठ्यात कसली म्हस हाय ? त्यापासून ती म्हस किती महिन्याची गाभन हाय ? हिथपर्यंत माहीती ठेवणारी लोकं असत्यात. गावात रुबाब कुणाला झाडता येत नही, कारण लगेच उतारा करून ठेवणारी लोकं पण हिथलीच. त्यामुळे तु शहाणा असलास तुझ्या घरात हिथं तंदारी नही करायची...! असा बाणा. सगळे अगदी कुठल्याही जातीपातीची धर्माची असूदेत. कायम रुबाब. तु काय लै शहाणा लागला नहीस. लै शिकलास नव्हं ? बापाच्या जीवावर शिकायला काय दुखतंय ? असं म्हणून प्रत्येकाची इज्जत काढायची हे ठरलेलं. ह्यात म्हाताऱ्यांपासून अजून खुट्ट्यातंनं वर न आलेली पोरं पण फटाकनं काय पण बोलून जात्यात. आणि तेवढ्याच जोरात पुढच्या माणसाच्या आब्रूचं खोबरं, खोबऱ्याची बर्फी हुतीय.   आम्ही गावातली पोरं सायन्सला एडमिशन घेटलं, सकाळी लवकर पी.ई (physical Education) ची तासं असायची. सकाळी ग्राऊंडवर मास्तर यायचं आणि प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित करायचं

अॉनर किलींग

अॉनर किलींग चे प्रकार घडालेत. हे आजचं नही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेलं हाय. ह्या प्रवृत्ती अलिकडच्या काळात वाढल्यात. काही ठिकाणी जात आडवी येते, धर्म येतो, आर्थिक परिस्थिती ये, कुंडली येते. काही ना काही कारणानं आईबाप समाज ह्यांच्या फुकटच्या गंडापायी समाजातील लेकरे विनाकारण हाणली चाललेत. ह्या गोष्टीचच काय कुठल्याही मरणाचं दु:ख आपल्याला फार काळ होत नाही. त्यांच त्यांना बघूदे वगैरे. किंवा त्याचा खून झाला माझं काय ? असा शेवटी प्रत्येकाचा प्रश्न असतो.    प्रेम हे जरी ठरवून होत नसलं. तरी पुढं जाऊन बऱ्याच समस्या येतात. ते कळायच वय लेकरांचं नसतं. म्हणून त्यांचं कुठलही कौन्सेलिंग न करता सरळ काटा काढायचा हा काय मार्ग नही. बापजाद्यांनी गुडगा घासला म्हणून काय मारायचं कांन्ट्रेक्ट मिळतंय अशातला भाग नही. समाजात एकमेकाचं स्वातंत्र्य मान्य करायची ताकद कुणाच्यात नाही. हे दूर्दैव जरी असलं तरी  त्यात जून्या अडाणी फळीचा पुरषार्थ दडलाय.  ह्या लोकांचं सोडून देऊ. सुशिक्षित लोकांनी तर काय निराळी दिवं लावलेत. हा पण प्रश्न ऊरतोच कि. शिक्षण आणि जाणीवा ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. शिकून जाणीव येत

गवारी

गवारी ही भाजी मला अजिबात आवडत नही. पण मापात पैशे करुन देतंय म्हणून दरवर्षी दोन प्लाट गवारी निघतंय. सौद्यात चाळीस रेट निघतो बसून विकलं तर ६०रुपये ते ८० रुपयांपर्यंत विकता येतंय. आणि त्यात मला बाजारात बसायला लै आवडतंय. आवडायच कारण म्हणजे आपण पैशे कमवत असतो हे प्रमुख कारण. बाजारात बसून लोकांचा अंदाज घेणे त्या गिर्हाईकाला त्यामापाने वेळ देणे, गिऱ्हाईक नसतंय त्यावेळी फुकटात निरीक्षण करणे असा उद्योग चालतो आणि त्यात मजा येते.  मी पाचवीला झाडावरची पेरू विकायला सुरवात केली. मी भावाला घेऊन जायचो, म्हणजे ते बारकं हुतं घरात ताप देतंय म्हणून माझ्याबरोबर असायच. मग लै काय नहीं तर पाचपन्नास रुपये व्हायचं. मग येताना त्याला गोळ्या बिस्किट चाकलेट चिरमूर फुटाणं वगैरे कायतर घ्यायचो म्हणजे त्यो एक आनंद असायचा भावाला कायतर घेऊन देतोय. असं कायबाय वाटायच. मग तिथंन पुढं नगावर म्हणजे उदाहरणार्थ कोथमीरच्या पेंड्या, मेथी,लालफोफळा असं विकण्याची बढती मिळाली. शाळेतले मास्तर म्याडम आलीत कि फुकटात एकदोन पेंड्या देऊन टाकत. त्याचा उपयोग मला झाला. मग परत शाळेत ते कधी तर नाव काढत नरदे तु दिलेली मेथीची भाजी आमच्या