कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!
गेला महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजत होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, दंड बडवून,शड्डू ठोकून एकमेकाला आव्हान-प्रतिआव्हान दिलं जात होतं. या निवडणुकीत स्वतः बंटी पाटील उतरल्यामुळे हि निवडणूक चर्चेची ठरली होती. ती मग जिल्हा पातळीवर न राहता राज्यपातळीवर चर्चेला आली होती. काल दुपारी अखेरीस चित्र स्पष्ट झालं आणि एकदाचा सोक्षमोक्ष लागून निवडणूकीचा कंडका पडला. या निवडणुकीत अप्पा महाडिक आणि त्यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलं. उत्पादक गटातील महाडिकांचे उमेदवार हे १०००-१२०० अशा फरकाने निवडून आले आहेत. कोल्हापूर म्हणजे जल्लोष आणि तसा जल्लोष पार पडला. यशाचे अनेक भागीदार असतात, महाडिकांनी आवाडे दादा, कोरे आणि धैर्यशील माने यांच्या सहभागाबद्दल आभारही मानले. या निवडणुकीचा निकाल आला आणि दूसऱ्या बाजूला सोशल मिडियावर मात्र बंटी पाटील यांच्यावर काही लोक टीका करू लागले, तर त्यांना पाटील समर्थकांनी उत्तरंही दिली. अशा या चर्चा असतात. दहावी बारावीचा निकाल आला आणि आपण पास झालो तर कुणी विचारत नाही. मात्र नापास झालो तर
टिप्पण्या