गाव तसं चांगलं
गाव म्हणजे ठराविक जणांचाच रुबाब, त्यांचाच हुकूम, ठराविक लोकच शहाणी असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पुर्वी हे असायचं पण. आत्ता परिस्थितीती बदलून नवीन गाव तयार झाला. गाव हे ठराविक लोकसंख्येचंच असल्याने कुणाच्या गोठ्यात कसली म्हस हाय ? त्यापासून ती म्हस किती महिन्याची गाभन हाय ? हिथपर्यंत माहीती ठेवणारी लोकं असत्यात. गावात रुबाब कुणाला झाडता येत नही, कारण लगेच उतारा करून ठेवणारी लोकं पण हिथलीच. त्यामुळे तु शहाणा असलास तुझ्या घरात हिथं तंदारी नही करायची...! असा बाणा. सगळे अगदी कुठल्याही जातीपातीची धर्माची असूदेत. कायम रुबाब. तु काय लै शहाणा लागला नहीस. लै शिकलास नव्हं ? बापाच्या जीवावर शिकायला काय दुखतंय ? असं म्हणून प्रत्येकाची इज्जत काढायची हे ठरलेलं. ह्यात म्हाताऱ्यांपासून अजून खुट्ट्यातंनं वर न आलेली पोरं पण फटाकनं काय पण बोलून जात्यात. आणि तेवढ्याच जोरात पुढच्या माणसाच्या आब्रूचं खोबरं, खोबऱ्याची बर्फी हुतीय. आम्ही गावातली पोरं सायन्सला एडमिशन घेटलं, सकाळी लवकर पी.ई (physical Education) ची तासं असायची. सकाळी ग्राऊंडवर मास्तर यायचं आणि प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित करायचं