महापूर

सण २००५ ला पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. लाखो लोकांचं स्थलांतर करावं लागलं. २००५ ला महापूर यावा असा काय महान पावसाळा नव्हता. पण भौगोलिक स्थिती मुळे तो पूर आलता. 
पुढे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सरकारने हवे ते बदल केले. नंतर बरेच पावसाळे आले गेले. २००५ पेक्षा जास्त पाऊस देखील पडला. पण पूराचा धोका टळला. 
तेच जर मुंबई बद्दल बघितलं तर दरवर्षी तुंबापुरी होतेय. आपत्तीवेळी कोण मदत करत नही ? सगळेच करतात. आमच्या शाळेला १ महिना सुट्टी पडली. त्या काळात सगळी पोरं रोज पुरग्रस्तांना खायप्यायला घरून डबे घेऊन जायची. 
पण लोकांच नुकसान झालं होतं. कुणी गप्प बसलं नाही. आणि खुळचट भावनिकतेत न अडखता नेत्यांच्या मागं लागून कामं करून घेतली. तेव्हापासून२००५सारखी परिस्थिती परत उद्भवली नाही. 
काल मुंबईत लोकांनी मदती केल्या एकमेकांना. ठीकच. पण उगचच दरवर्षी असं करत बसणार असला तर दरवर्षी च पूर येणार. तुम्ही नियोजन करण्यासाठी कधीच मागं लागणार नाहीत. कारण मुंबईतील लोकांना वेळ पण नसतोच. पण उगचच भावनेत गंडून दरवर्षी गुडगाभर कमरेभर पाण्यात अडकून पडायच कशाला ? 
त्या वाटणीच एवढ्या वर्षे सत्ताधारी असणाऱ्या लोकांना जाब विचारायला काय हरखत ? टॅक्स भरता, सगळ्यापेक्षा जास्त. तेव्हा हक्काचं चांगलं नियोजन करायला त्या सत्ताधारी लोकांना काय अडचण ?
ते भावनिक गंडवतेत तुम्ही गंडताय ह्याच वाईट वाटतंय. तसंही अस्वच्छ शहरात वरचा क्रमांक मुंबईचाच लागतोय. 
सोनूचं काय चुकलं नाय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!