देशभक्तांची तटस्थता

गेल्या काही वर्षात राजकारण झपाट्याने बदलत चाललंय. यात सोशल मिडीया, ईलेक्ट्रानिक मिडीया किंवा प्रिंट मिडीया ह्याचा वेग वाढतोय आणि नमुनेदाररित्या आपल्या पुढे बातम्या झळकतात. आता काही लिंकपाहिलं तर लक्षात येतं. अबब राखीने हे काय केलं ? त्यामुळे उत्सुकता चाळवून लक्ष खेचण्यात माध्यमं यशस्वी ठरतात. मुळात राखीनं काय केलं हे स्पष्ट न सांगता ते दडवून ठेवायच. आत वेबसाइटवर बातमी तर सामान्य असते. पण राखी नं काय केलं हे बघण्याची उत्सुकता राहवत नसणारे तिथं धडकतात. हाती काय तर राखीनं  अमुकतमुक पक्षात प्रवेश केला. ह्यात अबब करण्याईतकं काय असावं ?
अतिरंजीतता हा एक समाजमनाचा भाग होवून बसलाय हे पद्धतशीरपणे काही चाणक्यानीं आधीच ओळखलतं.
त्यातूनच एका मुंडक्याच्या बदल्यात शंभर मुंडकी किंवा चुनावी जुमले किंवा पाकिस्तान मध्ये फटाके ई भाषनं राजकारणाची बदलती दिशा ओळखून आलीत. त्यात ते पुरते फसले गेले. 
आज परत विविध टप्प्यात गेले अडीच वर्षे गोंधळच गोंधळ चालू आहे. अखलाक, रोहित वेमुला, कन्हैयाला देशद्रोही घोषित करनं, व्हाटसप संवादावर नजर ठेवणे, पॉर्न वेबसाइटवर बंदी आणने, गोहत्याबंदी इत्यादी घडामोडींनी सरकार ची नाकेबंदी व्हायची त्याचेच फलित म्हणजे स्मृती ईराणींना पदावरुन पायउतार केलं. पण हे गोंधळ फारफार तर पाचेक दिवसच टिकायचे तोपर्यंत एखाद्या च्यानेलला कुठल्यातरी साधु साध्वींनी बाईट दिलेली असायची. त्यावर परत गोंधळ व्हायचा. सातत्यान ेअसं कोणत्याही मुद्द्याचा शेवट झाला नाही. 
आज मात्र गेल्या आठ नोव्हेंबर ला केलेल्या नोटबंदीने सरकार जेरीस आलं. त्यात कमालीची सातत्यता देण्यात किंवा center of attraction टिकवून ठेवण्यात मोदींचा वाटा आहे. कारण दुसरा धमाका वगैरे करणार असल्याचं ते बोलले. त्याचा अर्थ लावण्यात काही जण व्यस्त झाले. पण यात तमाम जनतेच लक्ष खेचून घेण्यात मोदी यशस्वी झाले. निर्णय कुठतरी अंगलट यायची चिन्ह दिसताच मोदींच्या मातोश्री बँकेत आल्या येण्याबद्दल काही नाही पण हे सगळं रचलेलं होतं हे दिसतंच. बरं जर खरंच मानलं तर त्या वयाच्या वृद्धा रांगेत दिसल्या नाहीत. असो.
काही दिवसांनी पंतप्रधान स्वतः जाहिररित्या स्टेजवरुन रडले. एका देशाचा पंतप्रधान खंबीर निर्णय घेतल्यानंतर खंबीर न राहता अश्रू गाळतो ते सुद्धा जाहिररीत्या हे हतबलतेचं नसून कशाचं प्रतिक आहे ? 
नंतर फारच गोंधळ होतोय असं दिसताच थोडी चाल बदलली गेली हा निर्णय रिझर्व्ह बँकेचा असल्याचं सांगितलं. त्यानंतर काळा पैसा असणार्या नागरिकांना विनंती केली कि पन्नास टक्के कपात करून पैसा पांढरा करून देवू. हा कुठला न्याय असु शकतो ? सरळसरळ पैसे भरून गुन्हेगार सुटतो असाच याचा अर्थ होतो. नोटरद्दीकरणाच्या निर्णयानंतर बोकील नामक अर्थतज्ञ पहिले दोन दिवस मोदींची भलामन करण्यात मश्गुल होते. अर्थशास्त्र पाचवीच्या मुलाला समजावं इतकी सोपी मांडणी बोकील साहेबांनी केली. देशातील परिस्थितीचिघळत असल्याचं पाहता त्यांनी हात झटकले. एकदमच बोकील गायब झाले. तिथून ध्यानीमनी नसता अचानकच क्याशलेस ईकोनामी आली. बँकेच्या रांगेत ऊभं राहून देशभक्ती सिद्ध करायला लावणारे माननीय महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचीच ही दोनही विधानं. एका कृषी प्रधान राज्याचे मुख्यमंत्री ईतकं होपलेस बोलू शकतात ह्यावर विश्वास बसत नाही. सरळच आहे की मोबाईल किती लोकांना वापरता येतो. किंवा किती लोक मोबाईल वापरतात ह्याचा सर्वे तरी एकदा घ्यायचा. मुळातमोबाईल तर लांबचा चेकने किती शेतकरी लोक व्यवहार करतात हे जरी बघितलं तरीसुद्धा चित्र स्पष्ट होईल. पण हवेत गोळ्या मारायची लाटच देशातून राज्यात आली त्याला ते तरी काय करणार ?
........................    ..................
महिन्या दोनमहिन्यापुर्वी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा निघाला होता त्यात एका मोर्चेकर्यानं सरळ सरळ भाष्य केलं कि भुजबळ साहेबांनी फक्त साडेआठशे कोटींचा भ्रष्टाचार केलाय, मल्याने तर हजारो कोटी बुडवलेत. वरवर बघता हे विधान सामान्य व्यवहारीच आहे. जायचा तो संदेश गेलाच. मग प्रश्न असा पडतो कि भ्रष्टाचार करण्याला ठराविक रक्कमेची मर्यादा असावी कि काय ? 
हे निर्ढावलेपण कशातून आलं ? मल्ल्या हे जितंजागतं उदाहरण असताना हे साहजिकच आहे. त्यातून मानवी मनोवस्थाच अशी कि तुलनात्मक रितीने सगळ्या घटनांकडे पाहणे. फार कशाला ? आपले सरकारच साठ वर्षांत हे झालं का ? असच विचारतंय ना.
तिथे त्या सामान्य माणसाला चुकीचं म्हणायला ही वाव नाही. ललित मोदी किंवा विजय मल्ल्यांचे परदेशात ले फोटो एकामागून एक प्रदर्शित होतच असतात. एक माणूस हजारोकोटी बुडवून निवांतहिंडतो वरून बँकेलाच ठेंगा दाखवतो. तिथे एखादा नेत्यांच्या समर्थकाला दुःख होणे साहजिकच होतं. आज जगभर हिंडत असलेले आपले पंतप्रधान किर्तीवंत तर आहेतच पण तितकाच द्रष्टेपणा दाखवून मल्ल्याला मुसक्या बांधून लोळवत इथ आणलं असतं तर तो समर्थक तसा बोलता झाला असता का ?
मग त्यातूनच जातीधर्मानी बरबटलेल्या देशात ठराविक जातींवर ठरवून अत्याचार होतो असा कांगावा केला तर त्याला चुकीचं का ठरवावं ?
सामान्य माणसाला एक वागणूक आणि श्रीमंत लोकांना एक वागणूक हेच प्रतित होतं. 
वरतून एका शेतकऱ्यांनं एसबीआय बँकेला माझं कर्ज माफ करावं अशा आशयाचं पत्र लिहलं. त्याची छायाचित्रे सोशल मिडीयांवर झळकली. तशी त्या शेतकरी बांधवाची मागणी सुद्धा रास्तच म्हणावी लागेल.
..............................................................................................
ज्या गुजरात मॉडेल चा डंका पिटून मोदी सत्तेवर आले तिथल्याच बावीस वर्षाच्या एका तरुणानं गुजरात सरकारला पळताभुई थोडी केली. ते आंदोलन विझवण्यात सरकारने यश मिळवलं पण लागलीच तिथं गुजरात मध्ये दलित तरूणांना अमानुष रित्या मारहाण झाली, त्यावर उतारा म्हणून आनंदी बेन यांची उचल बांगडी केली गेली. ह्यात काय गुजरात विकास मॉडेल होतं ? लाखोंचे मोर्चे एका बावीस वर्षीय तरूणाच्या हाकेवरुन निघतात तिथे गुजरात काय अमेरिका असल्याचं भासवलं गेलतं त्याच्या ठिकर्या उडाल्या. हा भास जाणून बुजून तयार केला होता. हे तरी ह्या निमित्तानं स्पष्टपणे दिसून आलं.
......................................................................................... 
गेल्या दोनेक वर्षात कट्टर मोदी समर्थक लोकांना 'भक्त' असं गणलं जावू लागलं. मुळात भक्त हा देवाचा निस्सीम सेवक असतो. तीच तत्परता ह्या कार्यकर्ते लोकांनी दाखवल्याने भक्त ही पदवी तशी काही गैर नाही.
पण व्हायला असं लागलं कि भक्त लोक काहीही मोदी बोलोत. ते व्यापारी सैनिक लोकांपेक्षा महान आहेत बोलोत कि कालपरवा गाळलेले अश्रू असोत. मोदी हे बरोबरच अशी प्रत्येक ठिकाणी ते धारणा कराले. ते लिखाण असो कि बोलनं किंवा जाहीर वकतव्य असो. फक्त मोदींची तळी उचलने हा एककलमी कार्यक्रम च होवून बसला. त्यामुळेच त्यांच्या सातत्यपुर्वक समर्थनाने ते दुर्लक्षित होवू लागले. मग आता दुर्लक्षित होवू लागल्यावर बैचेन होवून पुढचा मार्ग त्यांनी अवलंबला. त्याला आजकाल तटस्थता असं सामान्य पणे म्हणटलं जातं. 
..........................................................................................
काय आहे तटस्थता ? 
महिन्यभरापुर्वी आमच्या भागात एक निवडणूक होती. सहकारी संस्थेची निवडणूक असल्याने शिक्का मारण्याच मतदान होतं. मतमोजणीवेळी बरोबर दोन उमेदवारांच्या नावामधील रेषेवरच काही मतं होती. ती बाद न ठरवता निवडणूक निर्णय अधिकार्यानं मोजायला घेतली. ती मोजताना अशी शक्कल लढवली कि शिक्का कोणत्या बाजूला जास्त उमटलाय हे मि.मी मध्ये मोजायचं. मोजलं गेलं आणि फक्त एका मतानं ते प्यानेल जिंकलं. हे उदाहरण एवढ्यासाठीच कि शिक्का तर मध्ये पडला होता. पण तो नक्कीच कोणीकडे तरी झुकला होता. यालाच सुक्ष्मसमर्थन म्हणतात याच्याच आधारे दोन्ही कडंचे खेळवत ठेवून दान टाकायचे तेच टाकायचे पण ते लक्षवेधी असं. ही नवीन पद्धत म्हणजेच तटस्थता. भक्तीसंप्रदायाचा समाजाला उबग आल्यानंतर संयमी भुमिकेची भुल देऊन पारडं जड करण्याची ही नवी खेळी आज दुर्दैवाने रुजायला लागालेली आहे. यावरून मी थोडंफार तटस्थ लोकांबद्दल बोलल्यानंतर एकाने टीका केली. त्या टीकेवरच एका प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकारानी, 'दोन्ही किनार्‍यावर बसून गोधळ घालणार्‍यांना मधून अख्खी नदी वहातेय याचे भान कधीच येत नाही. त्यांना बांधिलकीचे शिलेदार म्हणतात.' तर हे पत्रकार सगळ्यांना माहिती आहेत. ते असं बोलले. 2014 च्या लोकसभा निवडणुका चालू होत्या तेव्हा फक्त मोदीनामाचा गजर हे करत होते, विधानसभा निवडणूक लागली तेव्हा मोदीलाट अजून ओसरली नाही हे पटवून देण्याकरिता भले थोरले ब्लॉग लिहले. त्यांची भाषा कधीपासुन असा विचार करायला लागली ? ह्यांना आत्ताच हे सुचावं ह्यातच हे सगळी तटस्थतेमागे छुपे समर्थन करायलाच सुरवात केलीय. भलेथोर पत्रकार एककल्ली कट्टर समर्थन करणारे जर आज तटस्थतेचा मायाळू पुळका आणून वावरत असतील तर तोच मार्ग संप्रदाय चोखाळत आहे. ह्या तटस्थतेतून नियोजन पुर्वक खेळी करून समाजाला भुल देण्याचं हे काम युद्धपातळीवर सुरू झालंय. ह्याच संप्रदायाने कधीच कधीच जनलोकपाल असो कि एफडीआय असो तेव्हा कधी भिनली नसलेली तटस्थता अचानक पैदा का झाली ? 
सत्तेचे बुरुज ढासळू लागले जनक्षोभ उसळु लागला कि माजखोरीची भाषा जावून मवाळपणा येतो. हा मवाळपणा नाटकी आहे. हे संपूर्ण भारत देश जाणतोय.
आज शेती शेतकरी, छोटा उद्योजक जवळजवळ संपायच्या वाटेवर आहे.
रांगच्या रांग लागून एक नोट मिळते. तिच्या सुट्ट्याची तर बोंबच आहे. एक काळापैसावाला रांगेत नाही कि एक उद्योजक नाही. रोज येणारे नवनवे फतवे झेलावे लागतात. रांगेत थांबून लोक मृत्युमुखी पडतात. एवढं सारं दिसूनही न दिसल्यासारखं करून त्याला देशभक्तीची झालर लावणारे , सुधारणा विकासाची तुरे चढवणारे आणखी किती दिवस समर्थन करणार ? 
चुकीला चुक म्हणण्याची नैतिकता नसली कि देशप्रेमाचे नकली उमाळे दाटू लागतात. 
कोण करणार असेल तर करो समर्थन भाजपा सबकुछ मोदी असणार्या या मोदी सरकाराचा निषेध !!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं