फेसबुकवर असली तर

एकटं पोरगं सोबत दोन मित्रांना घेवुन विद्यापिठात गेलं होतं. निकाल घ्यायला. दुपारी बारा वाजताअर्ज केला. विद्यापिठातल्या मॅडम सरांनी सांगितलं साडेपाच वाजता रिझल्ट मिळेल. बारा ते साडेपाच तिघं जण मिळून विद्यापिठ सगळं हिंडून पालथं घातलं. मज्जा केली. साडेपाचला त्या ठिकाणी आले. पावणे सहा वाजता त्याचा रिझल्ट त्याला मिळाला. तरीपण तो त्या तिथल्या पुढच्याच खुर्च्यांवर बसून होता. बाकिच्या दोघांना काय कळंना म्हणून ते दोघे आले. झालं नव्हं काम. हे म्हणटलं झालं की....
मग चल की...
थांबा जरा...
मग सव्वा सहा वाजले तरी पण ते उठना तिथंन.
ह्या दोघांना भलतंच टेन्शन आलं.
मग साडेसहा वाजल्यावर ह्या गड्यानं खुर्ची सोडली.
मग बाहेर पडू पर्यंत ह्याला त्या दोघांनी काय बोलंल नाही. ( आपन कायतर बोललो तर हे परत आत जावून बसायचं gasp emoticon )
बाहेर आल्यावर विचारले पाऊण तास तिथं का बसला हूतास ?
असंच !
सांग की आम्हाला माहितंय प्रिथ्वी गोल हाय तुझा ईषय ख्वोल हाय !
मग हा जरासं फुगत आणि हसत सांगितला. ' तिथं पुढं एक पोरगी हूती माहित हाय का ? तीच ती लाल सँडल घातली हूती बघा, तीच नाव देवयानी हूतं'
मग काय तिचं नाव घेवुन काय रेशन कार्डावरंच तांदूळ घेणार हूतास ?'
'नाही रे तिच आडनाव ऐकायचं हूतं, फेसबुकवर असली तर.. रिक्वेष्ट वगैरे.....'
दोघं एकदम -सुक्काळीच्याऽऽऽऽऽऽऽऽऽ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं