ग्रॅव्हिटी

त्याच्या गावात समुद्र किनारा नाही. म्हणून त्यानं वातावरण निर्मीतीसाठी 140 ग्रॅम मीठ सुमारे 8 लीटर पाण्यात विरघळवून ते एका टबमध्ये भरलंय. खूर्चीवर बसून तो त्याचे दोन्ही पाय त्या टबात बूडवून खूप काही विचार करत बसला आहे. 
पोर्णिमेला भरती येते पण टबमध्ये फारसा काही फरक पडत नाही. ग्रॅव्हिटी कमी होऊन पाय आपलेआपन वर येत आहेत असं त्याला जाणवत आहे. 
ग्रीस ला साडे तेरा हजार किलोमिटरपेक्षा जास्त लांबीचा समूद्रकिनारा आहे. तरी तिथं गोव्यासारखं काहितरी उद्योग राबवून तिथल्या नाणेनिधीच्या प्रतिनिधी देशांच्या प्रमूखाना तसेच जर्मनीच्या जोखमा ला बीचवर एखांद दूसरी पार्टी या विकेंडला दिली तर ? ते खूष होतील. जर्मनीवाल्याला गंडवून काय केलं नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं तर ?
पाऊस गायब झालाय त्यामूळे दूष्काळाची परिस्थिती भारतात आहे. एका लिटरमध्ये 35 ग्रॅम मीठ असतंय. बर भारताछी लोकसंख्या जास्त आहे म्हणून 40 ग्रॅम धरू... ते मिठ काढून तेच पाणी शेताला वापरलं तर ? फडणवीसांना सांगावं की पवारसाहेबांना ?
पवारसाहेबांना नको फडणवीसांनाच सांगूया त्यांनीच गोवंश हत्या बंदीचा कायदा आणला. गोमुत्र आणि समुद्राचं साॅल्टमायन्सडं पाणी यांच्यामूळे शेती चांगली पिकेल.
अजून बरेच विचार ???

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!