शाकाहार आणि मांसाहार

शाकाहार आणि मांसाहाराबद्दल अनेक चर्चा चालू आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत मी शाकाहारी होतो. आहारात शाकाहार मांसाहार असली काय भानगड खरं तर नसते पोटात जातंय ते सगळं पवित्र असतंय असं माझ मत झालं. आठवीत असताना एका जवळच्या मित्राबरोबर जावून आम्लेट खाल्लं. चिमटीत उचलून ऊचलून. त्यात अति काय महान नसतं हे कळालं. 
त्यानंतर अंडा आम्लेट, बुर्जी, बाईल रेगूलर झालं. 
मग त्यातंच कोणत्यातरी महान माणसानं अंडी ही शाकाहारी असते असं सांगितलं, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या. एकंच अंडीचा पराक्रम नावावर होता. त्यातंच ते पण शाकाहारी.
मग ईतर मांसाहारी पदार्थ शोध घेतले तर त्यात आम्हास 'मासा' बरा वाटला. म्हणजे कोंबडी, बोकाड हिकडे तिकडे बोंबलत हिंडत असतात त्यामूळे ते बादगड असा समज होता. त्याउलट मासा हा पाण्यात असतो. सूरमई ही चांगली असते असे समजून मित्रांनी खावू घातलं. मला ते प्रचंड आवडलं. म्हणावे एवढे काटे नसतात त्यात. आणि जे असतात ते काढताना मज्जा येते. (मला हे काटे काढण्याचा प्रकार भारी वाटतो.).
त्यानंतर चिकन आलं. ते देखील भजी प्रमाणे असतं असे समजून खाल्लं. सूरवातीला साॅसची आर्धी बाटली लागायची ज्यावेळी आमची श्रद्धा चिकनवर नव्हती. कालांतराने चिकन हेच जीवन असलेले दोन मित्र भेटले. ते रोज नवीन नवीन दूकानं बदलत तीनशे ग्रॅम चिकन खायचं मी त्यावेळी शंभर ग्रॅम पर्यंत कुठतर पोचलो. हे बोलून दाखवलं तर ते मारायचे खाल्लं पिलेलं मोजायचं नसतंय म्हणायचे.
मग बिर्याणी.......
मित्राची छावी होती त्या गावच्या देवीची जत्रा हूती. आता त्या गावाला जावून यायची माझ्या मित्रवर्यांची ईच्छा होती. त्यासाठी महिन्याभर आधीचं जूळणा करून त्या गावचा एक मित्र केला. आपसुक त्यानं जत्रेला बोलावलं. थोडा पाऊस होता, रस्ता खराब आणि ते गाव कर्नाटक बाँड्रीला होतं. तरीपण नऊ वाजायला आम्ही त्या गावात गेलो. त्याच्या घरी जावून मंदीरात गेलो. ह्याची नटी आलती मित्र खूश झाला म्हणला 'देवी पावली' मग जत्रेत गेलो, पाळणं वगैरे झाल्यावर त्या मित्रानं त्याच्या मळ्यात सगळी सोय केलती जेवणाची दहा एक लोक जेवणार होते. माझा मित्र शाकाहारी त्याला वेगळी सोय केला. मला बिर्याणी खायची होतीच. आधी आम्ही लांबचे म्हणून त्यानं मला एकट्याला वाढलं अगायायाया काय टेस्ट लागली माहितंय ? अर्धं भोगूनं मीच हालवलं. शाकाहारी मित्राला म्हणटलं 'आता मला देवी पावली बघ !' मग घरात ज्याज्यावेळी मसाला भात असतो तेव्हां हटकून बिर्याणीच्या उचक्या लागतात.
पुढं जावून असं वाटालं कि कोंबडीची हाडकं चावण्यात काय पाँईट नाही. मग आम्ही बोकडाच्या मटणावर डोळा ठेवलो मग परत मित्रमंडळी मिळाली मग बर्यापैकी बरं वाटलं. बिरोबा वगैरे देव आणि त्यांचे नवसाळू भक्त खास मटणासाठी मला अत्यंत प्रिय वाटतात. पुढे फेसबुकवरचे मित्र देखिल मला मटण खावू घातले. अशा रितीने मी घरातला प्रथम मांसाहारी व्हायचा मान मिळवला.
तुम्ही ज्यावेळी प्रथम खात असता तेव्हां तुमचे मित्र, मित्रांच्या घरातील व्यक्ती आपूलकीने जेवायला वाढतात. म्हणून पोटात जातंय ते सगळं पवित्र असतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!