जोकपाल

आण्णा हजारे आणि माझं काय बांधाला बांध नही. ना आण्णानं आमचं पपईचं झाड तोडलंय, ना मी आण्णाचं एरंडमुंगळीच झाड तोडलंय. 
आण्णा हजारे हे परवा परत लोकपाल वगैरे लावायला परत आंदोलन करणार अशी खबर आमच्या कानावर आली. काय करणार लोकपाल आणि लोकायुक्त घेऊन ? 
ती काय धुतलेली असतात काय ?
अंदाकारण फ्लॉप शो हाय हे. 
एका उदाहरणार्थ सांगतो हे मी. (म्हणजे बोकील काका कसं झटपट सांगतेत तसंच अगदी) 
हे बघा मला जनतेने सांगितलं कि , हे घे धा रुपये आणि एक पेन आण. 
तर मी आठ रुपयाचा पेन आणणार आणि दोन रुपये खाणार. 
आता लोकपाल आणि लोकायुक्त हे दोघं आले तर लोकपाल ला २ रू, आणि लोकायुक्त ला १रू खायाला घालणार आणि ५रूपयाचा पेन आणणार. मग जनतेला ८च दिलेलं चांगलं कि ५ चं .
कुठलं शुद्ध विचार वगैरे काय नसतंय. सगळे पैसे खाऊ असतात. लोकपाल आणि लोकायुक्त भ्रष्ट निघले तर काय मी उपोषनला बसू काय ?
त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि लोकं. कोण सांगिटलंय असला फालतू कारभार ?
नोटबंदीत बोंबलत भाजून गेल्या जनता. लोकपाल आणून तिरडीवरची सुतळी घच्च आवळली जाईल. त्यामुळे ते काय नको. 
त्यामुळं आण्णांनी घ्यावी विश्रांती हाच नातू म्हणून प्रेमाचा सल्ला. 🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं