संभाजीराजे , कोल्हापूर

छत्रपती संभाजीराजे.
२००८ ची निवडणूक होती. ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हातकणंगले लोकसभा मतदार संघ तयार झाला. त्यावेळी खासदार श्रीमती निवेदिता माने होत्या.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात त्यावेळी खासदार कै. सदाशिवराव मंडलीक होते. दोन्ही जागा राष्ट्रवादी च्या.
२००८ ची निवडणूक जाहीर झाली. कै. सदाशिवराव मंडलीकाची राष्ट्रवादी कडून दुसरी टर्म पुर्ण झाली होती. श्रीमती निवेदिता माने वहिनींचीही तिच गत होती.
पवार सायबांनी कै. मंडलिकांना तिकीट नाकारल. आणि कोल्हापूर चे यूवराज छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट दिलं.
तोपर्यंत संभाजीराजे कोण ?
ह्याची खबर कोणालाच नव्हती.
कदाचित पवार सायबांना सातारा पॅटर्न लागू करावा वाटलं असावं.
त्यापुर्वी राजु शेट्टी शिरोळ विधानसभा मतदारसंघात रजनीताई मगदूमांचा पराभव करुन आमदार झाले होते. (ही कै. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटलांची ऐतिहासिक चुक होती.) आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष यात्रा काढून (यात त्यांच्या पायाला फोड वगैरे आले होते.) दुध दरवाढ आणि ऊसाचा ३८० रुपयाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून वातावरण बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी करण्यात यश मिळवलं होतं.
त्यावेळचे सदाभाऊ ऐन फॉर्मात होते. या उलट निवेदिता माने यांच्याकडे एक शिक्षणसंस्था सोडली तर दुसरं काही नव्हतं.
सदाभाऊची भाषनं, राजु शेट्टींची संघर्ष यात्रा आणि त्यातच सदाशिवराव मंडलिकाना तिकीट नाकारलं जाणं. ह्या सगळ्यात राष्ट्रवादी विरोधी वातावरणात भरच भर पडली.
MMS मंडलीक महाडिक शेट्टी.
याच २००८ च्या निवडणुकीत कै. मंडलिकांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी विरोधात हे दोघे एकत्रित आले. त्याचमुळे त्यांची ताकद वाढली. महादेवराव (आप्पा) महाडिक यांनी शेट्टी मंडलीक यांना मदत केली. या तिघांची आघाडी होऊन एमएमएस गट्टी तयार झाली.
राजे कधी पॅलेस सोडायचे नाहीत. तर त्यांचे बंधू मालोजीराजे आमदार (काँग्रेस कडून) होते. त्यांचही काम तसंच रटाळ होतं.
त्यात सदाशिवराव मंडलीक हे ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थाने लोकनेते होते.
त्यांनी बंडखोरी केली. ईकडे शेट्टींनी रान पेटवलं. त्यात दोन्ही मतदारसंघात महाडिक युवाशक्तीन हात पसरल होतं. कारखानदारांविरोधातला रोष पुढं आलाच होता. शिवाय राष्ट्रवादी ने निष्ठावंत मंडलिकांना नाकारलं याचाही राग होता.
एरवी कोल्हापूरकर पवारसायबांचा आदेश डावलत नव्हते. तरुणात लोकप्रिय असणाऱ्या धनंजय महाडिकांना उद्देशून कौन है ये मुन्ना ?
म्हणून पवारांनी विचारलं होतं. त्यावेळी मुन्ना महाडिक पडले.
पण २००८ च्या निवडणुकीत संभाजीराजे आणि मानेवहिनींचा बक्कळ मोठ्ठा पराभव झाला होता.
सातारा आणि कोल्हापूरात हाच फरक.
साताऱ्यात एकटाक उदयनराजे राज्यच करतात. पण कोल्हापूरातला हरेक गडी स्वतःला सरकारच समजतोय. त्या न्यायानं कोल्हापूर कधीच कुणाला झुकलं नाही.
ह्याचवेळी अखंड देशात मोदीलाट आली पण कोल्हापूरात राष्ट्रवादी आली आणि मुन्ना खासदार झाले.
तर सांगायची गोष्ट अशी कि, २००८ नंतर संभाजीराजे राष्ट्रवादी सोडल्यात जमा होऊन मराठा तरुणांबरोबर बऱ्यापैकी जोडले गेले. यात त्यांच्या कार्याची माहिती नाही. मराठा चेहरा म्हणून त्यांना थेट राज्यसभेवर भाजपनं घेतलं याच राहून राहून आश्चर्य वाटलं. ह्या मागे चंद्रकांत दादा असावेत. तर असो.
ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या मागंच कारण हेच कि, भाजपने मंत्री पद राजेंना देणार अशा चर्चा कानावर आल्या. पण त्यांचा जनमानसातला चेहरा उदयनराजेंच्या कैक पटीने डावा वाटतोय. तिथं भाजपने मंत्री पद देऊन पण त्यांना काहीच फायदा होणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!