जग भलत्या वेगानं पुढपुढं सरकायला लागलंय. लहाणपणापासूनचा आता पर्यंत चा प्रवास रिवाईज केला कि झालेली बदलं आठवायला लागतेत. आम्ही शाळेत जायचो. आताची पोरं पण जात्यातच. दीड किलोमीटर पायपीट करत शाळेला जावं लागायचं. पण त्याचं काय वाटायचं नही. आज दीडेक किलोमीटर चालायच म्हणजे हातात गाडी असताना का चाला ? म्हणून प्रश्न पडून मन किळसवाणं होऊन जातंय. आणि आपण गाडीवरौनंच जातोय. आम्ही पाचवीत असताना मोबाईल आला. कोणतर मोबाईल वर बोलायला लागला कि त्याचं मोठं कौतुक वाटायच. त्याकाळी बऱ्यापैकी नेत्यांची पोस्टरं कानाला मोबाईल लावल्याची फोटो असायची. नोकीयाचे ब्लॅक अँड व्हाईट टु कलर मोबाईल यायला चालू झालं. ईनकमिंगला पण चार्ज पडायचा. नोकिय स्यामसंग कंपनीच्या मोबाईल नी त्यावेळंला वारंच केलतं. मल्टिमिडीया मोबाईल आलं. एसेमेस एमेमेस. झालं. रेडिओ लागायचा. माझ्याकडं आठवीत नोकियाचा 6030मोबाईल आला. मोबाईल चालवायची अक्कल लै आली. त्याकाळात मजा वाटायची एकमेकाला मिसकॉल मारायला वगैरे. हळूहळू एमपीथ्री मोबाईल आलीत. गाणी मेमरी कार्ड आलं. मग आपल्या आवडीची गाणी ऐकायला आली.
फोटो व्हिडिओ एनेबल मोबाईल आलीत. त्यात सर्रास बीप्या बघण्यासाठी मोबाईल जरूरी असायच्या. चौकात कट्ट्यावर बसून ब्लुटुथवरनं बीप्या सोडायची. नटनटी (जास्त करुन तमिळ नट्यांचे फोटो असायचे. ज्यांची नावं आजतागायत माहिती नाहीत.)
मग आम्ही कॉलेजला जाऊ लागलो. तसं मोठ्या आवाजाची Sigmatel alfatel rocker अश्या नावाची चायना फोन आली त्याकाळी एस.टीत कोण जोरात आवाजात गाणी लावतोय ह्याची स्पर्धा असायची. मग ते मोबाईल बोंबलत गेले. आणि सॅमसंग ने एँड्राइड फोन आणले. तवा आम्ही व्हाटसप फेसबुक वगैरे वापरायला लागलं. एसेमेस वगैरे जुनं झालं.
आत्ता जगातली जास्त भांडणं ह्या मोबाईल मुळं व्हायला लागली. अगदी मोबाईल वरनं स्टेटस अपलोड करून कितीतर लोकांनी आत्महत्या अलिकडच्या काळात केली. ब्लु व्हेल सारखे भयानक गेम वगैरे आले. त्याचे बरेचसे लाभार्थी मेले.
साध्या मोबाईल वर शुट झालेलं भाषनपण एखाद्या नेत्याला राजकारणातून कायमचा उठवायला भाग पाडली. काहींवर ट्रोलींग झालं, मिडीया ट्रायल झाली, फेसबुक स्क्रिनशॉट झाले.
अशा रितीनं आपलं जगणं कुठतरी किडूकमिडूक होऊन ह्या साधनांच्या आधीन झालो.
अॉफिस मध्ये, मॉलमध्ये क्यामेरे आले. कामचुकारपणा करु नये ह्या पेक्षा त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवावं हाच उद्देश ह्यामागं असावा अशी शंका यायला वाव असावी.
तुमची इच्छा नसताना तुम्ही काम कसं करू शकता ? ह्यावरही विचार व्हायला हवा.
गर्दी आणि गोंगाटाच्या ह्या वादळावर एकच विषय कधी टिकून राह्यला नाही. सोशल मिडियावर दोनेक दिवस वाद चघळला जातो. क्विक कार्टुन तयार होतं. दुसऱ्या दिवशी त्यावर एकदोन अभ्यासु अग्रलेख रविवारच्या पुरवणीत भुतकाळापासूनच विवेचन, प्राईम टाईम डिबेट हे एकदा संपलं कि चर्चेत दुसरा विषय येतोय. परत रिपिटेशन्स ह्याच. आपल्या एकूणच सोशल मिडियावरच्या वावरात अनेक हत्या आपत्ती धार्मिक जातीय दंगली निवडणूक व्यक्तींच निधन भ्रष्टाचार झपाट्याने आलं आणि गेलं पण. ह्यात एक जरी वादाचा शेवटर्यंत पाठपुरावा झाला असता तर मानलं असतं.
आम्ही सारे दाभोळकर. वगैरे घोषणा मीही कधीतरी दिल्या. मग लिस्टच वाढत गेली. दाभोलकर पानसरे कलबुर्गी लंकेश. आता आम्ही कोण ? आम्ही सारे दाभोलकर कलबुर्गी पानसरे लंकेश म्हणून घोषना द्यायची ? कि अजुनची लिस्ट वाढल्यावर स्तोत्र रचून म्हणत बसायचं ?
नोटबंदी सर्जिकल स्ट्राइक जीएसटी कुठकुठले किती मत लक्षात घ्यायची ? कि कंटाळून लोकशाही जाऊदे एकाच्याच हाती कारभार राव्हा ह्या निर्मळ हेतूनं हुकमशाही आणण्याची वाटचाल कुठतरी चालू असल्याचच हे वातावरण.
आतंकवाद बाहेरच्या पेक्षा आतले देशी दहशतवादी तर काय कमी आहेत कि काय ?
६३ लोकं निष्काळजीपणं मरतात त्याचं काहीच कुणाला शेवटपर्यंत वाटलं नाही. नाशकात पोरं मेली त्याचं कुणाला काही वाटलं नाही.
शेतकरी संघटना तर फेमस झाल्या. जयाजी आणि कोणकोण कायकाय ? अॉनलाईन फॉर्म भरा. काय शेतकरी तेवढा सुशिक्षित झाला तर मग लै झालं कि. प्रधानमंत्री जनधन योजनेत झिरो ब्यालन्स वर खाती उघडली तिथं काय शाळवाचं धसकाट टाकायचं काय ?
तर हा काय त्या भाजप पक्षाचा पण दोष नही. दोष आपल्या पण सगळ्यांचा हायच कि.
कधी काळी समाजसेवक आजोबा कायकाय बोलायचे ? काय झालंय आज ? आज पेट्रोल असूदे गॅस असुदे सगळ्याच गोष्टी कुणाला परवडालेत ? एक शेतकरी अल्पभुधारक शेतमजूर ह्यांच जगणं आजघडीला भयंकर मुश्किल होऊन बसलंय. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील प्राथमिक शाळा असतील रेशनिंगच धान्य असलं तर सगळ्याच गोष्टी कमीप्रतिच्या. मग त्यावरचा विनाकारणचा खर्च तरी का म्हणून करावा ? डेव्हलपमेंट गुजरात मॉडेल विकास वगैरे शब्द बोंबलत कधी गेलं ते कळलंच नही. छाती बडवून छाती मोजून भाषनं खोटारडी झाडतो पंतप्रधान आणि सगळं जनता खपवून घेत बसलीय.
कशात काहीच आलबेल चालंलंय असं कुठंच नाही.
नोटा (NOTA) हाच मुर्खपणाचा कळस. तुमचं मत तुम्ही अज्ञाताला कसं देऊ शकताय.
जगण्याचा वेग वाढला पण कुणाची कुणाला काहीच पडलेली नाही. इथं आई मेलेली पार तिची हाडं होऊपर्यंत लक्ष नाही. तिथं दाभोलकर पानसरे कलबुर्गी लंकेश तरी कुणाच्या कोण लागाव्या ?
२०१४ च्या निवडणुकीनंतर कुठलं एकतरी आंदोलन पुर्ण झालंय ? मागण्या मान्य झाल्यात ? विरोधी आवाज उठलाय ?
मंत्रीमंडळात ज्या काही पद्धतीनं अधिकाऱ्यांना स्थान मिळतंय हे बघून तर थक्कच व्हायला होतंय. काय भरोसा त्यांनी त्या काळात आजच्या सत्ताधारी लोकांना काही पदरात टाकलंय त्याचीच ते फळं भोगत नसतील ?
समाज बटबटीत असंवेदनशील होत चाललाय. व्यवस्थेला विचारणारं कोण नाही. कुठल्या दिशेनं प्रवास चालू हाय देशाचा कळत नाही.
मेल्याच्यानंतर दुसऱ्या मिनटाला एखाद्या व्यक्तिविषयी द्वेषपुर्ण वातावरण तयार होतंय.
चारही खून एकाच पद्धतीने होतात. मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही लागत त्यावेळी पोलीस यंत्रणेविषयी शंका निर्माण का होऊ नये ?
चार खुनांचा शोध लागत नाही हा कळसच म्हणायला पाहिजे. एवढे ते गुन्हेगार चलाख होते कि काय ? कि त्यांना पुढं आणायचच नाही ? हेतू तर कळायला पाहिजेत.
कुणी सोवळं पाळतंय, कुणी गोमाता पाळतोय कोण देशाच्या अभिमानाबद्दल आपले प्रॉडक्ट विकत घ्या म्हणून लागलाय. तर खुद्द पंतप्रधान एका कंपनीचा जाहिरातीत मिरवतो. कायपण डिंगडँग करतो. आणि देश सगळं जी जी वगैरे करत मानत बसतो. आता देश खड्ड्यात चाललाय पण जर पुर्णच गेला तर त्याला आपणही जबाबदार असू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!